मी जिंकायचा कधी प्रयत्नच केला नव्हता; त्यामुळे मी कधी हरलोच नाही!
जिंकण हारणं हा आहे फक्त एक पाठशिवणीचा खेळ;
जिंकल्याशिवाय हारू शकत नाही; नि हरल्याशिवाय जिंकू शकत नाही!
जिंकणारा हारणाऱ्याला एकच सांगून जातो, 'जिंकायचं असेल, तर…… हारायची तयारी ठेव;
आणि हरायचं नसेल तर ……… जिंकायची तयारी सुरु कर'!
खर तर जिंकलेला कधी जिंकलेला नसतोच,
फक्त हारलेला हरला असतो, म्हणून तो जिंकतो!
कुणी काय जिंकलं आणि कोण किती हारलं, याचे फालतू हिशेब ठेवणारा खेळायचा आनंद घ्यायचा विसरतो, आणि मग हारायाच्या भीतीनं खेळायलाही घाबरू लागतो!
जो जिंकण्या - हारण्याची तमा न बाळगता खेळतो, तो खेळतच राहतो, आणि अखेरीस जिंकतच रहतो. कारण जो खेळायचा राहतो, तो जिंकायचा काय; पण हारायचाही राहतो!
खर तर हारणं किती मस्त आहे!
न हारणाऱ्याला जिंकायचा आनंद कसा मिळेल!
जर जिंकण नित्याचाच झालं तर त्यातली मजाच निघून जाईल, आनंद हरवेल, आणि जर आनंदच हरवला तर जिंकले तरी काय असा प्रश्नच आहे!
ज्याला हारण माहित आहे तोच जिंकतो,
कारण जिंकलेला कधीतरी हरलेलाच असतो!
--
सारंग भणगे (2000)
No comments:
Post a Comment