Wednesday, July 2, 2008

सागरा प्राण तळमळला!




जर मी सावरकरान्सारखा त्या सागर किनारी असतो, तर कदाचित मला हे गीत स्फ़ुरले असते.सागरा प्राण तळमळला सारखे अजरामर गीत पुन्हा जन्मणे नाही. त्यामुले हे गीत हां तर खरा एक प्रामादच आहे. परन्तु कविच्या मनात स्फुरलेली एक कविता असे म्हणून ही काव्यपुष्पांजली स्विकारावी.

ढाळीन का मी अश्रु, माते असे वाटते तुजला!
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

ही अवघी वसुंधरा, नको स्वर्गाचा की वारा,
मज मायभू परी दूसरा, नको अन्य कुणाचा थारा।
तीज चरणी मज वाहू,
त्यास्तव मरण यातना साहू,
नेत्रातून वाहिल्या धारा, हां सागरकाठही भिजला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

चीत्कार करी काळीज, अन् मनी सळसळे वीज,
जरी कायेची होवो झीज, पेरू स्वातंत्र्याचे बीज।
वीराची ही आरोळी,
रुधिराची खेळू होळी,
केवळ तव भेटीला, हां नश्वर देह मी पिंजला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

गगनचुम्बी या इमारती, क्रिडेत अविरत कामरती,
काळीमाही जेथ अंधारती, ही पापाचीही अवनती।
हां विलास असे परी नंगा,
मज स्मरे हिमालय नि गंगा,
या सागरकाठी शिंपला, मी मोतीयासवे त्यजला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

मज हनुमंताची वाटे असूया, साधली उरभेदाची किमया,
करी विश्वास हे अनसूया, न च अव्हेरुस माझी माया।
मज रात्रंदिन तुझाच ध्यास,
तव स्वातंत्र्या अर्पण श्वास,
जरी सूळावरी चढला, जीव तुझ्यावरी हां जडला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।

हां आङ्ग्लभाषिक ढोंगी, करी मन्मातेला बंदी,
उन्मत्ता, अखेरची संधी, सुरु स्वातंत्र्याची नांदी।
करू क्रांतीचा उद्घोष,
अन् स्वातंत्र्याचा जल्लोष,
मम मातेच्या त्या भाळी, सूर्याचा तिलक सजला,
जरी वियोग भूमीचा झाला, राष्ट्र अनुराग न विझला।






1 comment:

bmahajan@gmail.com said...

khup apratim aahi rachanaa

Related Posts Plugin for WordPress, Blogger...