Saturday, December 31, 2011

मुग्धमोहिनी

नयनसुरेने तुष्टविलेस तू सूरासूरांना,
अधरसुरांनी उष्टविलेस तू स्वर-सूर्यांना.

हे हेमांगी तव कनक-काया नभास उजळे,
ती तेजस्वी तव चांदण-चर्या निशेस उजळे.

कपोल-कोमल, श्यामल-कुंतल ललना लोभस,
नासिका नाजूक कालिका, कांती साजूक सालस.

"उरोज ते जणू सरोज राजस", राजकुमारी,
नाभी भिनवी नवी भावना नवी खुमारी.

कटाक्ष टाकता कट्यार कटीची काटे काळीज,
तंबो-यापरी नितंब भासे भाजे काळीज.

घोटीव कोरीव सौष्ठव हरपे जाणीव-नेणीव,
नखशिखांत नखरा निखळ नाही काही उणीव.

खाण देखणी लावण्याची कृतार्थ ईश्वर,
कविता दर्पण तारुण्यार्पण धन्य कवीश्वर.

Saturday, December 10, 2011

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझाच मी शोध घेत आहे,
किती जरी सांगतो मनाला तुझाच ते ध्यास घेत आहे.

नसूनही तू मला दिसावी; रडून ही असावे हसावी,
तुझे असे खेळ जीवघेणे खुळावूनी प्राण घेत आहे.

अजाणता जाणता तुला मी हळूच गे घेई बाहुपाशी,
मनातल्या मी मनात माझ्या तुझीच रे भेट घेत आहे.

भले न द्याव्या कुणीच टाळ्या; कडा पुसाव्यात लोचनाच्या,
तुझ्याच हे गीत वेदनांचे अजूनही दाद घेत आहे.

जगू कशाला तुझ्याविना मी मारायचे आज काय बाकी,
तरी कधी वाटते मला कि तुझाच मी श्वास घेत आहे.
=====================================
सारंग भणगे. (२० नोव्हेंबर २०११)

Tuesday, December 6, 2011

आत्मसमर्पण

ज्वलंत असलं

तरी क्षणाचंच आयुष्य घेऊन संपणा-या

कापुरानं

रात्रीच्या गर्भातल्या गर्द काळोखाला शह द्यायचा नसतो.


रतीच्या मादक... खरं तर घातक सौंदर्यापुढे

चंद्रानं स्वत:ची मंत्रमुग्ध रेशीम किरणं

सुर्यानं सुवर्ण कुंडलं

आकाशानं हक्कचं शाश्वत क्षितिज

निसर्गानं अक्षय सर्वस्व आणि

आसमंतानी मनोहर अस्तित्व शुद्ध हरपुन गमावलय...

हे ठाऊक असुनही.....


त्यानी आपलं आयुष्यच काय...

पण आपले कल्पनाभास.... मोगरी वास आणि सगळे अम्रुतश्वासही पणाला लावले.


.....इतका विश्वास तर रातराणीलाही स्वत:च्या उन्मत्त गंधाचा नसेल.


पण...

असह्य वेदनांचं

हळवेपणाची असहाय्यता उपभोगणं

हे अमानुष तर असतच पण

त्याही पेक्षा ग्रुहीत असतं.....


त्यानी आयुष्यच जुगारात लावलं होतं आणि...... ....आणि तो हरला होता....!

राखेच्या उध्वस्त उदरात विखुरलेल्या निद्रिस्त पक्षाचं

राखेतुन उठुन भरारी घेणं

फक्त काल्पनीकचं असतं

...............हे त्याच्या अजाण जाणिवांना कधी जाणवलंच नसावं....


कारण आयुष्य हरुनही

त्याला पुन्हा एकदा

काळोखाच्या अभेद्य साम्राज्याला जिंकुन

एक मोकळा श्वास घ्यायचा होता...


...........तसही त्याच्याकडे आता हरण्यासारखं कही राहीलंच नव्हतं.


त्याच्या ह्या आव्हानाला आवाहन समजत ती म्हणाली

" तुझं जग, तुझा जीव, तुझी प्रत्येक गोष्ट

माझी गुलाम असताना

कशाचा जोरावर तुला माझा जीव जिंकायचाय ? "


तो म्हणाला

ह्या वेळेस मी माझ्या कविता जुगारावर लावेन.... !


तो म्हणाला

ह्या वेळेस मी माझ्या कविता जुगारावर लावेन.... !


आसुरी समाधानाच्या त्रुप्ततेनं भरलेला

तिचा नेहमीचा उग्र चेहरा

पहिल्यांदाच निस्तेज झाला.

आणि....


आणि न लढताच तिनी हार मानली.... आता ती त्याची गुलाम झाली होती.

आज पुन्हा एकदा तो त्याच्याच कवितांवर जगत होता...


आत्मसमर्पण करणा-या

तिच्या पराभुत गर्वाला

तिच्या उद्विग्न डोळ्यातला काळोख म्हणाला...

"जे जे काही अस्तित्वात आहे त्यावर फक्त आपलंच अधिराज्य असताना, हे आत्मसमर्पण का ? "


ती म्हणाली...

"तो त्याच्या श्वासांशिवाय जगु शकतो पण त्याच्या कवितांशिवाय नाही.

ह्यावेळेला जर तो हरला तर

त्याच्या आयुष्यात तर काही रहाणार नाहीच पण

त्याच्या कवित नसतील तर ह्या जगातही जगण्यासारखं काही उरणार नाही.


ह्या म्रुतावह ब्रम्हांडावर राज्या करुन मरण्यापेक्षा

त्याचं स्वामित्व पत्करुन

त्याच्या कवितेत जगणं जास्त सुखावह आहे.... "


आता तोच काय...

........ती सुद्धा त्याच्या कवितांवर जगत होती.



धुंद रवी.
=======================================================================

गुरूजी प्रणाम!


पुन्हा एक अस्सल बावनकाशी कविता. एका परडीतुन फ़ुले, अंगार, गारा आणि गारगोट्या सा-यांचीच बरसात व्हावी जणु.


एखादी खाण शोधुन काढल्यासारख्या कविता आहेत तुझ्या सख्या.


अग्निबाण फ़ेकतोस, पण जिव्हारी लागत नाहीत.


फ़ुलं फ़ेकतोस, पण जखमा करून जातात.


कविता वाचून छातीचा भाता नुसता फ़ुरफ़ुरू लागतो शब्दांच्या जीवंत प्रवाहात न्हाऊन आल्यामुळे.


एक विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवातला झटका, असा चटका लावुन जातो कि एखाद्या झिंग आणणा-या नशेबाज वस्तुचे सेवन पुनःपुन्हा करावे असे वाटावे तसेच काहीसे.



तुझ्या कविता फ़ार वाचल्या तर साला नशाच होईल...........


 
- सारंग भणगे. 

Sunday, December 4, 2011

मोती


तुमने बारिश जो छुली होती; बूंद बूंद फिर बन जाते मोती,
होठो से तू लब्ज जो कहती; वो भी तो फिर बन जाते मोती.

जिनकी नमी ने पलकें तेरी छुली वो है आंसू मोती,
जो तू उनको छू पाती तो; चाँद सितारे बन जाते मोती.

तू जो कागजपर लिख देती; अक्षर भी फिर बन जाते मोती,
सुंदर तेरे रूप को पाकर; जीवन ही फिर बन जाये मोती.
=========================================
सारंग भणगे (१ दिसम्बर २०११)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...